
''ख्वाडा'' या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबुराव कऱ्हाडे यांना विशेष जूरी पुरस्कार प्राप्त झाला सोबतच सर्वोकृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कारही ''ख्वाडा''साठी महावीर सब्बनवाल यांना प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित ''एलिज़ाबेथ एकादशी'' या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार अविनाश अरुण दिग्दर्शित ''किल्ला'' या चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोकृष्ट लघुपटाचा मान रवी जाधव दिग्दर्शित ''मित्रा''ला मिळाला आहे.
गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने बाजी मारताना दिसून येत आहे. २०० ४ ते २ ०१४ या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मराठी चित्रपटांनी सातत्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चमकदार कामगीरी केली आहे. उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन,अभिनय, संगीत, संहिता, संवाद अशा सर्वच क्षेत्रात मराठी चित्रपटांनी पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. उत्कृष्ट सामाजिक चित्रपट व उत्कृष्ट बाल कलाकार या श्रेणीत तर कायम मराठी चित्रपटाचा वरचष्मा राहिला आहे. या वर्षी पुरस्कार मिळवण्याळया चित्रपटांसह गेल्या दहा वर्षात देवराई,उत्तरायण, गिरणी, एक सागर किनारी, इट्स प्रभात, द्विजा, डोम्बिवली फास्ट, शेवरी, टिंग्या, निरोप, जोगवा, गंध, हरीचंद्राची फैक्टरी, नटरंग, बाबू बैंड बाजा, चैंपियंस, मी सिंधुताई सपकाळ, मला आई व्याहाचय, पिस्तुल्या, देऊळ, शाळा, बालगंधर्व, विष्णुपंत दामले - बोलपटाचे मूकनायक, जय भीम कामरेड, ऐरावत,धग, अनुमती, संहिता, इन्वेस्टमेंट, फँड्री, अस्त, आजचा दिवस माझा या चित्रपटांनी, त्यातील कलवंतांनी व तंत्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून मराठी चित्रपट सृष्टीला नवी भरारी दिली आहे. या सर्व नव-नवीन कथा, कल्पना, सामाजिक आशय, दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांनी आपल्या मराठी चित्रपटांला अधिकाधिक समृध्द केले आहे.
No comments:
Post a Comment