Showing posts with label yanda kartavya aahe. Show all posts
Showing posts with label yanda kartavya aahe. Show all posts

Saturday, 16 January 2016

केदार शिंदे

आज (१६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! केदार शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्द शाहिर "शाहिर साबळे" यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदीमध्ये केदार शिंदे यांनी "तो बात पक्की" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • अगं बाई... अरेच्या (२००६)
  • जत्रा (२००६)
  • यंदा कर्तव्य आहे (२००६)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • ह्यांचा काही नेम नाही (२००८)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००८)
  • गलगले निघाले (२००८)
  • इरादा पक्का (२०१०)
  • ऑन ड्यूटी २४ तास (२०१०)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३) 
  • खो खो (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)

Tuesday, 31 March 2015

''कॉफी आणि बरेच काही''च्या निमित्ताने

सध्या मराठी युवक मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपटांकडे वळत आहेत, त्यामुळे युवकांच्या आवड व निवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जात आहेत. मराठी चित्रपटांमध्ये युवकांशी संबधित विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. असाच एक चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. रवी जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरेच काही'' आजच्या युवकांची, त्यांच्या प्रेम व लग्नविषयक संकल्पनाची गोष्ट आहे. करियरमुळे लग्नाचे वय वाढत आहे, त्याचबरोबर युवकांमध्ये लग्नविषयक अनेक प्रश्न व दुविधा असतात. नेमक्या ह्याच प्रश्नांना घेऊन अलिकडल्या काळात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिति झाली आहे. हा प्रश्न मराठी चित्रपट वेगवेगळ्या प्रकारे मांडताना दिसून येत अाहे. 

अलीकडच्या काळात ''मिस मैच'', ''तप्तपदी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''लग्न पहाव करून'', ''टाईम प्लीज'', ''असा मी तशी ती'', ''काकस्पर्श'', ''मुंबई पुणे मुंबई'', ''सनई चौघडे'', ''फॉरेनची पाटलीण'', ''मणि मंगलसूत्र'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''दोघी'' हे चित्रपट लग्न संस्थेविषयी चर्चा करतांना दिसून येतात. ''सनई चौघडे''मध्ये कुमारी मातेचा प्रश्न तर ''काकस्पर्श''मध्ये बाल विधवेचा प्रश्न अतिशय संवदेनशीलपणे हाताळण्यात आला होता. लग्नावरच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मुंबई पुणे मुंबई २'' या चित्रपटाची टैग लाईन ''लग्नाला यायच'' अशी आहे.   

काही चित्रपट लग्नानंतरच्या विविध भावनिक समस्या मांडतांना दिसून येतात त्यामध्ये ''अ रेनी डे'', ''पुणे ५२'', ''प्रेम न्हणजे प्रेम असत'', ''प्रेमाची गोष्ट'', ''गुलमोहर'' व ''शेवरी'' अशा चित्रपटाचा समावेश आहे. अशा विषयावरचा सतीश राजवाडे यांचा ''प्रेमाची गोष्ट'' हा अतिशय सुन्दर चित्रपट आहे.

किरण नाटकी