Showing posts with label dr. prakash baba amte the real hero. Show all posts
Showing posts with label dr. prakash baba amte the real hero. Show all posts

Friday, 1 January 2016

नाना पाटेकर

आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आपल्या अभिनायाने आणि आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाने नाना पाटेकर यांनी चित्रपट रसिकांच्या मनात घर केलेले आहे. त्यांनी "प्रहार" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही केले आहे. २०१३ साली भारत सरकारतर्फे त्यांना "पदमश्री" या सम्मानाने गौरवण्यात आले आहे. नानांना नेमबाजी या खेळाची आवड असून त्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. ते अभिनयासोबतच समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक सामाजिक कार्यांना व संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. याच भावनेतून त्यांनी २०१५ साली अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ''नाम फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली आहे. हि संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुम्बियांसाठी कार्यरत आहे. 

आज त्यांचा महेश मांजरेकर दिग्दर्शित "नटसम्राट" हा मराठी चित्रपट प्रदर्शित  आहे. हा चित्रपट नानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.   

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • वेलकम बॅक (२०१५)
  • अब तक छप्पन २ (२०१५)
  • डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)
  • द ॲटॅक ऑफ २६/११ (२०१३)
  • देऊळ (२०११)
  • राजनीति (२०१०)
  • इट्स माय लाइफ (२००९)
  • वेलकम (२००७)
  • हॅटट्रिक (२००७)
  • टैक्सी  नम्बर ९२११ (२००६)
  • अपहरण (२००५)
  • अब तक छप्पन (२००५)
  • पक पक पकाक (२००५)
  • ब्लफ़ मास्टर (२००५)
  • आँच (२००३)
  • डरना मना है (२००३)
  • भूत (२००३)
  • वध (२००२)
  • शक्ति : द पावर (२००२)
  • गैंग (२०००)
  • तरकीब (२०००)
  • कोहराम : द एक्सप्लोजन (१९९९)
  • हुतूतू (१९९९)
  • युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे (१९९८)
  • वजूद (१९९८)
  • गु़लाम-ए-मुस्तफ़ा (१९९७)
  • यशवंत (१९९७)
  • अग्निसाक्षी (१९९६)
  • खामोशी : द म्यूझिकल (१९९६)
  • हम दोनों (१९९५)
  • क्रांतिवीर (१९९४)
  • अभय (१९९४)
  • अंगार (१९९२)
  • तिरंगा (१९९२)
  • राजू बन गया जंटलमन (१९९२)
  • दीक्षा (१९९१)
  • प्रहार : द फायनल ॲटॅक (१९९१)
  • थोडसा रूमानी हो जाएँ (१९९०)
  • दिशा (१९९०)
  • परिंदा (१९८९)
  • त्रिशाग्नी (१९८८)
  • सलाम बॉम्बे (१९८८)
  • सागर संगम (१९८८)
  • अंधा युद्ध (१९८७)
  • अवाम (१९८७)
  • प्रतिघात (१९८७)
  • मोहरे (१९८७)
  • सूत्रधार (१९८७)
  • अंकुश (१९८६)
  • दहलीज़ (१९८६)
  • आज की आवाज (१९८४)
  • गिद्ध : द व्हल्चर (१९८४)
  • भालू (१९८०)
  • गमन (१९७८)

Saturday, 18 April 2015

विदर्भातील मराठी चित्रपट सृष्टि

काल ''ते दोन दिवस'' हा नागपूरच्या रंगकर्मीनी निर्मित/ दिग्दर्शित केलेला व बहुतांश चित्रीकरण नागपूर आणि परिसरातच झालेला चित्रपट प्रदर्शित झाला. ''ते दोन दिवस''च्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरातील पर्यायाने विदर्भातील मराठी चित्रपट सृष्टिची चर्चा होत आहे. ह्याच चर्चेच्या अनुषंगाने अलीकडे नागपूर व विदर्भामध्ये मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 

संत्रानगरी सोबतच नागपूरची एक ओळख प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे शहर अशी हि सुद्धा आहे. राजकुमार हिरानी आज हिंदी चित्रपटात आघाडीचे दिग्दर्शक असल्यामुळे जेव्हा त्यांची चर्चा होते साहजिकच त्यावेळेस नागपूरची पण चर्चा होते. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म सुद्धा नागपूरचा, पण नागपूरचे आणि चित्रपटाचे नाते या पेक्षा कितीतरी जुने आहे. राजकुमार हिरानी व सुभाष घई हि फ़क्त प्रतिनिधिक उदाहरणे आहेत, त्यांच्या बरोबरीने मूळचे नागपूरचे बरेच कलाकार हिंदी व मराठी चित्रपट सुष्टित, टिवीवर कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व तंत्रज्ञ न्हणुन चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.

मागील दशकात मराठी चित्रपट सुष्टित बरेच बदल घडून आले. मराठी चित्रपट रसिक पुन्हा चित्रपट गृहाकडे वळु लागला. चित्रपटांची संख्या वाढू लागली. नवनवीन विषयामुळे साहजिकच नवनवीन चित्रीकरण स्थळाचा शोध घेणे भाग पडले, सोबतच विदर्भातून नवीन दमाचे निर्माते व दिग्दर्शक मराठी चित्रपट सुष्टित आपली ओळख निर्माण करू लागले. त्यामुळे साहजिकच विदर्भात चित्रपट निर्मितीची संख्या वाढू लागली. मागील वर्षात विदर्भात निर्माण झालेल्या चित्रपटाचा आढावा घेतला असता हीच बाब निदर्शनास येते. असे असेल तरी जर मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे असेल तर मुंबईला स्थाईक होणे गरजेचे होते. आता हि परीस्थिती फारसी बदललेली नसली तरी कुठेतरी या बदलाची प्रक्रिया नक्कीच सुरु झाली आहे. 

कालच प्रदर्शित झालेल्या ''कोर्ट'' आणि ''ते दोन दिवस'' या चित्रपटांचे महत्वाचे नागपूर कनेक्शन आहे. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या ''कोर्ट'' या चित्रपटात नागपूरचे वीरा साथीदार केंद्रीय भूमिकेत आहेत तर ''ते दोन दिवस'' या चित्रपटात निर्माते, दिग्दर्शक, कलावंत सब कुछ नागपूरकर आहे.     

विदर्भातील विलास उजवणे, गिरीश ओक या सारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता भरत गणेशपुरे, केतकी माटेगावकर, वैभव तत्ववादी, समिधा गुरु या सारखे वैदर्भीय कलावंत आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. संजय सुरकर यांनी आपल्या आशयपूर्ण चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले, त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपट सुष्टीचे नुकसान झाले. आता तेजस देऊस्कर, आशीष उबाळे, अभिजीत गुरु हे दिग्दर्शन मराठी चित्रपट सुष्टित विदर्भाचे प्रतिनिधित्व करत आहे. या दिग्दर्शकांनी विदर्भामध्ये चित्रपट निर्मिती करत अनेक स्थानिक कलावंतांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून संधी दिली आहे. दिग्दर्शकांबरोबरच विदर्भातील निर्मात्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे.                            

आशीष उबाळे यांनी ''हिरवा चूड़ा'' व ''बाबुरावला पकडा'' या दोन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापैकी ''हिरवा चूड़ा''चे चित्रीकरण नागपूरला तर मल्टीस्टारर ''बाबुरावला पकडा''चे चित्रीकरण चक्क बैंकॉकला करण्यात आले होते. अभिजीत गुरु या युवा दिग्दर्शकाने नागपूरच्या कलवंतांना घेऊन ''दिमाग झालाय ख़राब'' (२०१२) हा चित्रपट दिग्दर्शित केला.  या चित्रपटाचे निर्माते सुद्धा नागपूरकर प्रकाश लखानी होते. 

सतीश मनवर दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी अभिनीत ''गाभ्रीचा पाऊस'' ह्या २००९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे सम्पूर्ण चित्रीकरण अमरावतीच्या ग्रामीण भागात झाले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन साकारतानां विदर्भातील खऱ्या खेड्यात चित्रीकरण झाल्यामुळे, या चित्रपटात वास्तविकपणा आला होता. या चित्रपटात नागपूरचे कलावंत मुकुंद वसूले, विनोद राऊत यांनी पण महत्वाच्या भूमिका सकारल्या होत्या.          

केदार शिंदे दिग्दर्शित व सिद्धार्थ जााधव, सोनाली कुलकर्णी अभिनीत ''इरादा पक्का'' ह्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून स्मिता मेघे यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ''इरादा पक्का''चे चित्रीकरण नागपूर व चिखलदरा परिसरात करण्यात आले होते. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''जेता'' या चित्रपटाच्या माध्यमातून लोकमत वृत्तपत्र समुहाने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. 

२०१२ साली नागपूरचे निर्माते राजू घिवधोंडे, मंगेश पितळे, रमण सेनाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर आधारित ''अघोर'' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागपूरचेच प्रसिद्ध नाट्यकर्मी दिग्दर्शक सलीम शेख यांनी केले होते तर प्रमुख भूमिकेत संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, किशोरी शहाणे होते. या चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा नागपूरला झाले होते.          

२०१३ साली प्रदर्शित झालेला संजीव कोलते दिग्दर्शित ''तानी'' हा चित्रपट ही सम्पूर्णपणे नागपूरमध्ये चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटात तानीची प्रमुख भूमिका केतकी माटेगावकर यांनी केली होती तर तानीच्या वडिलाच्या भूमिकेत अरुण नलावडे होते. या चित्रपटाचा सेट फूटाळा तलाव क्षेत्रात लावण्यात आला होता. याच वर्षी नागपूरचे निर्माते संदीप केवलानी यांचा संदीप कुलकर्णी अभिनीत ''अजिंक्य'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर येथील क्रीडा संकुलात करण्यात आले होते. विशेष न्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर मूळचे नागपूरचेच आहेत. २०१३ साली निर्माते इंजीनियर मोरेश्वर मेश्राम यांचा ''रेला रे'' हा भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथे चित्रित झालेला व उपेन्द्र लिमये यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. जेव्हा आपण विदर्भामध्ये चित्रपट निर्मितीचा विचार करतो तेव्हा इंजीनियर मोरेश्वर मेश्राम यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. इंजीनियर मोरेश्वर मेश्राम ''३१ डिसेम्बर''(२०१२)  व ''रेला रे''(२०१३) हे दोन मराठी चित्रपटाचे निर्माते आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मोरेश्वर मेश्राम हे विदर्भामध्ये सातत्याने चित्रपट निर्मिती करत असून या माध्यमातून त्यांनी अतिशय वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहे. २०१४ साली त्यांनी ''लास्ट बेन्चर्स'' या हिंदी चित्रपटाची निर्मिती सम्पूर्ण नागपूरकर असलेल्या टीमला घेऊन केली.     

नागपूरमध्ये सातत्याने चित्रपट निर्मिती करणारे व्यक्तिमत्व न्हणजे श्याम धर्माधिकारी. चित्रपट निर्मितीच्या सर्वच क्षेत्रावर पकड ठेवणारे श्याम धर्माधिकारी यानी मराठी सोबतच हिंदी आणि भोजपुरी भाषेतही चित्रपट निर्मिती केली आहे.    

विदर्भात अगदी अलीकडे चित्रित झालेला चित्रपट न्हणजे मागील वर्षी सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''. डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण खऱ्या लोकेशंस न्हणजे गडचिरोली जिल्हाच्या भामरागड़ भागात झाले होते. नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी अशी दिग्गज मंडळी असलेला हा चित्रपट, या दुर्गम भागात व आदिवसींसोबत चित्रीकरण केल्यामुळे खूपच सुन्दर झाला होता.      

''कापूस कोंड्याची गोष्ट'' या चित्रपटाचे चित्रीकरण यवतमाळ जिल्हामधील पुसद येथे झाली आहे. या चित्रपटामधून शेतकरी वडिलाच्या मृत्यूनंतर होणारा शेतकऱ्यांचा मुलींचा संघर्ष दाखवण्यात अलाय. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, भरत गणेशपुरे व नागपूरच्या समिधा गुरु यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृणालिनी भोसले आहेत. या चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असून विदर्भात चित्रित झालेला चित्रपट पहिल्यांदाच ऑस्करच्या शर्यतीत दाखल झालाय. त्याच्यासाठी निर्मात्याचेही विशेष कौतुक करायला हवे.          

आता फ़क्त नागपूरमध्येच नाही तर विदर्भाच्या इतर ही जिल्हांमध्ये चित्रपट निर्मिती होत आहे. हि विदर्भाच्या सांस्कृतिक चळवळीसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. विदर्भात चित्रीकरण झाल्यामुळे येथील स्थानिक कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध होत असते. स्थानिक कलावंत ही या संधीचा चाांगला उपयोग करून घेतात हे या पूर्वी विदर्भात चित्रित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. 

विदर्भात चित्रीकरण करण्यासाठी अनेक चांगल्या लोकेशंस उपलब्ध आहेत, हे ह्या पूर्वी विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आता विदर्भात चित्रपट निर्मितीसाठी या गोष्टीचे मार्केटिंग करणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सरकार, स्थानिक निर्माते, कलावंत, वृत्तपत्र यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे. त्या दृष्टीने सरकारने नागपूरमध्ये फिल्म सिटी उभारण्याचा विचार करणे गरजेचे आहे. नागपूरमध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी असलेल्या सर्व आवश्यक सोयी सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. सध्या देवेन्द्र फडणवीस हे नागपूरकर असलेले अतिशय अभ्यासु व्यक्तिमत्व मुख्यमंत्रीपदि असल्यामुळे या बाबतीत पाउले उचलली जातील अशी अपेक्षा करुया. विदर्भात चित्रीकरण वाढल्यामुळे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Saturday, 29 November 2014

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''

मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.

जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.

डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.

एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.

या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे. 

Monday, 13 October 2014

मराठीत स्त्री दिग्दर्शकांची भरारी

सध्या मराठी चित्रपटांची संख्या चांगलीच वाढली असून आपला मराठी चित्रपट नवनविन विषय घेऊन पुढे येत आहे. त्यामुळे अनेक कलाकार व दिग्दर्शक यांना संधी मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरुन सहज लक्षात येते की मराठीमध्ये महिला दिग्दर्शकांचे नवीन पर्व सुरु झाले आहे. मागील काही महिन्यात जवळ पास प्रत्येक आठवड्यात महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ऑगस्ट महिन्यांमध्ये सुमित्रा भावे यांचा ''अस्तु'' आणि मृणाल कुलकर्णी यांचा ''रमा माधव'' प्रदर्शित झाला, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनवा नाईक दिग्दर्शित ''पोरबाजार'', मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''राखणदार'' व ह्या शुक्रवारी समृद्धि पोरे यांचा ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' व रेणु देसाई यांचा ''इश्क़वाला लव'' प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या महिला दिग्दर्कांमध्ये कांचन अधिकारी व सुमित्रा भावे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल कारण त्यांनी सातत्याने अनेक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिलीय. मध्यंतरी रेणुका शहाणे यांनी ''रीटा'' च्या निमित्ताने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले होती. महिला दिग्दर्शकांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटांमध्ये संगीता बालचंद्रन यांच्या ''चिंतामणी'', क्रांति रेडकर यांच्या ''काकण'' आणि स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या ''मितवा''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. यावरून आता हे महिला दिग्दर्शकांचे पर्व असेल सुरु राहणार याची शाश्वती मिळते. 

विशेष न्हणजे फक्त दिग्दर्शक न्हणुनच नव्हे तर चित्रपटांमध्ये इतर ही क्षेत्रात त्यांचा वावर वाढतो आहे. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''सांगतो ऐका''च्या निर्माता विधि केसलीवाल आहेत. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ''टपाल''च्या निर्मात्या वर्षा सत्पालकर आहेत. या सर्व बाबी मराठी चित्रपटांमध्ये महिलांचा वाढता वावर स्पष्ट करणाऱ्या आहे. 

Sunday, 12 October 2014

डॉ प्रकाश बाबा आमटे

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''डॉ प्रकाश बाबा आमटे'', ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' व ''इश्क़वाला लव''.

समृद्धि पोरे दिग्दर्शित '' डॉ बाबा प्रकाश आमटे '' मधून नाना पाटेकर यांनी देऊळ नंतर बऱ्याच दिवसांनी मराठीत पुनरागमन केलय, सोबतच ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद व्यक्त होताना दिसतोय. नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांची जोडी व केमिस्ट्री हे ही ह्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये न्हणावे लागेल. हि जोडी ह्या आधी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''देऊळ'' या चित्रपटातूनही मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' ह्याच वर्षी मी वाचले असून त्यामध्ये संवेदनशील करणारे अनेक प्रसंग होते. त्यामुळे मला सुद्धा या चित्रपटाची प्रतीक्षा होती.

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'' या धमाल विनोदी राजकीयपटाचा सीक्वल आहे. एकी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना, मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे अशी दिग्गज मंडळी या चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटालाही मराठी प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.  

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तीसरा चित्रपट ''इश्क़वाला लव'' हा चित्रपट एक प्रेमकथा असून ''एक वेगळी प्रेमकथा'' अशी टैग लाइन निर्मात्यांनी या चित्रपटाला दिली अाहे. आदिनाथ कोठारे अभिनीत या चित्रपटाच्या दिग्दर्शक रेणु देसाई आहेत.

या शुक्रवारी वेगवेगळ्या धाटणीचे तीन चांगले चित्रपट प्रदर्शित झालेत, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्कीच त्यांचा आनंद घ्या.

किरण नाटकी