Showing posts with label 70s. Show all posts
Showing posts with label 70s. Show all posts

Wednesday, 7 October 2015

रवीन्द्र महाजनी

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रवीन्द्र महाजनी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 
सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टितील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ''जुलुम" या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. "आराम हराम आहे", "मरी हेल उतारो राज", "दुनिया करी सलाम", "तीन चेहरे", "चोरावर मोर", "गोंधळात गोंधळ", "लक्ष्मीचे पाऊले", "बेआबरू", "मुंबईचा फौजदार", "बढ़कर", "गंगा किनारे", "नैन मिले चैन कहाँ", "कानून कानून है", "वहम" आणि "गूंज" हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. या वर्षी त्यांनी ''काय राव तुम्ही" या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी या वर्षी चित्रपट सृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.

किरण नाटकी